Sunday, 30 May 2021

लॉकडाऊन अनुभव

    लॉकडाऊन अनुभव.

साधारणपणे २५ मार्च २०२० पासून आपण कोरोना व लॉकडाऊन अनूभवतो आहोत. या काळात आपणस सर्वांनी वेगवेगळे अनुभव घेतले आहेत. काही चांगले तर काही वाईट असे आपण अनूभव घेतले आहेत. आता याच कालावधीत मला आलेला अनुभव. तो चांगला की वाईट योग्य की आयोग्य हे आपले आपण ठरवावे.

माझा मुलगा हा पुणे येथे नोकरीस आहे. लॉकडाऊन मधे तो घरुन काम करत होता. लॉकडाऊन मधे सवलत मिळाले नंतर तो घरी सातारा येथे आला होता व घरुनच लॅपटॉपवर काम करत होता. दरम्यान माझे जावई यांनी जॉब बदललेने ते माझी मुलगी व ३ वर्षे वयाची नातं हे बंगलोरला शिफ्ट होणार होते. नात लहान असल्याने मी व पत्नी त्यांचे बरोबर बंगलोरला जाणार होतो. पुणे येथून रेल्वे रिझर्व्हेशन केले होते. त्यासाठी पुणे येथे जायला हवे होते. मुलांचा फ्लॅट भुगाव पुणे येथे आहे. त्याप्रमाणे ईपास काढून एखादा दिवस आधी पुणे येथे मुलांचे फ्लॅटवर जाऊ असे ठरवले. त्याबाबत मुलाने पुणे येथील त्याचे सोसायटीच्या लोकांना सांगितले तेव्हा त्याला जे ऊत्तर मिळाले ते तेथील लोकांची मानसिकता दाखवणारे होते. पुणे येथील त्याचे सोसायटी मधील लोकांनी मुलाला सांगितले की तुम्ही व तुमची पत्नी यायला हरकत नाही पण तुमचे आई वडील हे कायमस्वरूपी तुमच्या सोबत येथे रहात नाहीत त्यामुळे त्यांना या लॉकडाऊन मधे येथे येता येणार नाही. हे असले ऊत्तर हे काय दर्शवते ? असो नंतर आम्ही पुणे येथील मुलीचे फ्लॅटमध्ये आलो. तेथील सोसायटी मधील लोकांनी फारसे आढेवेढे घेतले नाहीत. तेथे दोन दिवस होतो नंतर विमानाने बंगलोरला आलो.

आता बंगलोरची कथा बंगलोर येथील फ्लॅट बंगलोरला प्रत्यक्ष न येता व्हिडिओ वर फ्लॅट पसंद करुन व जागा मालक यांचेशी फोनवर घरभाडे, डिपॉझीट ठरवले होते. प्रत्यक्ष एकमेकांना भेटलो नव्हतो किंवा पुर्वीची ओळख नव्हती. फ्लॅटची किल्ली आमचे कडे नव्हती. रात्री १२:३० ला बंगलोर येथे उतरलो पण अपरात्री घरमालक यांना त्रास देणे ऊचीत नव्हते म्हणून त्यांना सकाळी ७ वाजेपर्यंत फ्लॅटवर येतो असं सांगितलं व त्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ वाजता फ्लॅट वर आलो तोपर्यंत घरमालक आलेले. येताना ते आम्हा चौघांसाठी चहा व नातीसाठी दुध बिस्किटे आणली होती. आम्ही १४ दिवस क्वारंटाईन होणार असलेने त्यांनी किल्ली व चहा आमचे कडे दिला. नंतर पुन्हा १० वाजता सर्वांना भरपेट नाश्ता आणून दिला व दुपारी १ वाजता भरपेट जेवण आणून दिले. शेजारी लोकांची ओळख करून दिली. शेजारच्या लोकांनी सुध्दा सांगितले की तुम्ही क्वारटाईन आहात त्यामुळे तुम्ही घरातून पाऊल सुध्दा बाहेर टाकू नका तुम्हाला जे हवे ते सहकार्य आम्ही करु काय पाहिजे ते आम्ही आणून देऊ पण तुम्ही घरात राहून स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. त्याप्रमाणे क्वरंटाईन संपेपर्यंत आम्ही कोणीही घराचा उंबरा ओलांडला नाही. जे पाहिजे ते घरपोच मिळणेची सोय करुन दिली. आता आज क्वरंटाईन संपले व आजपासून थोडी मोकळीक मिळेल. 

दोन वेगवेगळी राज्ये दोनी महानगरे एक राजधानीचे शहर तर एक विद्येचे माहेरघर दोन वेगळे अनूभव आपणा बरोबर शेअर केलेत. कोणाबद्दल काही तक्रार नाही. किंवा कोणी कसा विचार करावा हे आपण ठरवू शकत नाही. कोण बरोबर कोण चूक हे ठरवायचा अधिकार नाही . जे मनाला खटकले ते मांडण्याचा प्रयत्न.


No comments:

Post a Comment